Lyrics

स्वातंत्र्याचा सूर उगवला पण उषःकाल होत असताना अंधारू लागला कवी सुरेश भटांनी या परिस्थितीच फार यथार्त वर्णन या कवितेत केले आहे उषःकाल होता-होता, काळरात्र झाली उषःकाल होता-होता, काळरात्र झाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली उषःकाल होता-होता, काळरात्र झाली उषःकाल होता-होता, काळरात्र झाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली उषःकाल होता-होता, काळरात्र झाली आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी? जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी? कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली आ, उषःकाल होता-होता काळरात्र झाली तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती आम्हांवरी संसाराची उडे धूळमाती आम्हांवरी संसाराची उडे धूळमाती आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली आ, उषःकाल होता-होता काळरात्र झाली उभा देश झाला आता एक बंदिशाला उभा देश झाला आता एक बंदिशाला जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली आ, उषःकाल होत-होता काळरात्र झाली धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली आसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली आ, उषःकाल होता-होता काळरात्र झाली
Writer(s): Yashvant Dev, Suresh Bhatt Lyrics powered by www.musixmatch.com
instagramSharePathic_arrow_out